maharashtra-rain-alert: राज्यात पुढील ४-५ दिवस गारपिटीची शक्यता; या जिल्ह्यांत मेघगर्जना होणार!
maharashtra-rain-alert: राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या उष्णतेने कहर माजवला असून, अनेक जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा थेट ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेला आहे. नागरिकांना उन्हाच्या झळांनी हैराण करून टाकले असतानाच आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उष्णतेची तीव्रता – तापमान ४२ अंशांवर
राज्यभर सध्या कमाल तापमान प्रचंड वाढले आहे. रविवारी वाशिममध्ये सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भात ४२ ते ४४ अंश, तर कोकणात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतली जात आहे.
पुढील काही दिवसांत हवामानात बदल
राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत ५ ते ७ मे दरम्यान अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत ६ आणि ७ मे रोजी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागात ७ मे आणि विदर्भात ५ मे रोजी गारपिटीसह अवकाळी पावसाचे अंदाज आहेत.
मुंबईतही पावसाची शक्यता
राजधानी मुंबईत ६ आणि ७ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे.
जनजीवनावर परिणाम
राज्यात तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागत आहे. सध्या दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत.
राज्यात सध्या तीव्र उष्णतेसोबतच गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.maharashtra-rain-alert
हे पण वाचा : दस्त नोंदणी सोपी; प्रत्येक तालुक्यातून करा जमिनीचा दस्त