jalatara-khadda: मनरेगातून जलतारा खड्डा: कुठे, कसा काढावा आणि किती अनुदान मिळते?

jalatara-khadda: मनरेगातून जलतारा खड्डा: कुठे, कसा काढावा आणि किती अनुदान मिळते?

jalatara-khadda: मनरेगातून जलतारा खड्डा: कुठे, कसा काढावा आणि किती अनुदान मिळते?

 

jalatara-khadda: “हर खेत को पानी” आणि “Catch The Rain, Where It Falls, When It Falls” या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मनरेगाच्या (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या) माध्यमातून जलतारा खड्डा उपक्रम सुरू केला आहे.

हा उपाय म्हणजे शेतीतील पावसाचे पाणी शेतातच अडवण्याची आणि जिरवण्याची अत्यंत प्रभावी पद्धत. विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी ही संकल्पना फायदेशीर ठरते.

जलतारा म्हणजे काय?
जलतारा म्हणजे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरवण्यासाठी शेतात केलेला विशिष्ट प्रकारचा खड्डा. हा खड्डा शेतातील उतारावर असतो आणि त्यामध्ये मोठ्या दगडांचा वापर करून पाण्याचा झपाट्याने झिरपण्याचा मार्ग तयार केला जातो.

जलताराचे फायदे
• ३.६० लाख लिटर पाणी एका खड्ड्यामधून ४ महिन्यात जमिनीत झिरपते.
• पावसाचे ३५% वाहून जाणारे पाणी वाचवता येते.
• विहिरीची पाणी पातळी वाढते, त्यामुळे सिंचनासाठी जास्त कालावधीपर्यंत पाणी मिळते.
• जमिनीत ओलावा टिकतो, पीक उत्पादन वाढते.
• जास्त पावसात शेतात पाणी साचत नाही; त्यामुळे पिके सडत नाहीत आणि जमीन चिबड होत नाही.
• मनरेगातून रोजगाराची संधी मिळते.

जलतारा कुठे व कसा करावा?
1. शेताचा उतार असलेला भाग निवडा, जिथे पाणी एकत्र होते.
2. त्या ठिकाणी ५ फुट x ५ फुट x ६ फुट (१.५ मी x १.५ मी x १.८० मी) आकाराचा खड्डा खणावा.
3. खड्डा ८०mm ते १००mm आकाराच्या टोळ दगडांनी भरावा.
4. मुरुम किंवा लहान दगड टाकू नयेत.
5. शोषखड्ड्यासारखेच हे पाणी जमिनीत झिरपवतात.
6. मनरेगा विहिरीतील दगड वापरण्याची मुभा आहे.

मनरेगातून अनुदान व मनुष्यदिन

विभाग अंदाजे खर्च (₹) मनुष्यदिन अकुशल/कुशल प्रमाण
डोंगरी विभाग ₹5,264 17 दिवस 90.50% / 9.50%
इतर विभाग ₹4,643 15 दिवस 89.23% / 10.77%

महात्मा गांधी मनरेगा योजनेचा उद्देश
• ग्रामीण भागातील प्रौढ, अकुशल व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे.
• पाण्याच्या साठवणुकीसारख्या शाश्वत मालमत्ता तयार रणे.
• शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे.

“जलतारा” हा तुमच्या शेताच्या भविष्याचा जलस्रोत आहे. या उपक्रमामुळे केवळ पाणी साठत नाही, तर जमिनीचा पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो.jalatara-khadda

हे पण वाचा : महिलांसाठी खास योजना… मोफत पिठाची गिरणी मिळणार कोणाला?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top