rain alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील २ दिवस वादळी वाऱ्यांसह या भागांमध्ये पावसाचा इशारा

rain alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील २ दिवस वादळी वाऱ्यांसह या भागांमध्ये पावसाचा इशारा

rain alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील २ दिवस वादळी वाऱ्यांसह या भागांमध्ये पावसाचा इशारा

 

rain alert: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. विशेषतः मध्य भारतासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१२ ते १३ जून दरम्यान पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १२ ते १३ जून दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तसेच येत्या पाच ते सहा दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसतील, असेही संकेत मिळत आहेत.

७ आणि ८ जून महत्त्वाचे दिवस
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, शनिवार ७ जून रोजी राज्यातील घाट भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर रविवार ८ जूनला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी येतील.

घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस
पुणे, सातारा, सांगली या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय घाटमाथ्यावरही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत जाऊ शतो.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस मध्य महाराष्ट्रात?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या बदलत्या स्थितीचा विचार करून शेतीच्या कामाची योजना आखावी. तसेच नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांपासून स्वतःची सुरक्षितता बाळगावी.rain alert

 हे पण वाचा : राज्यात या तीन जिल्ह्यांत फळ रोप निर्मिती केंद्र सुरु होणार; केंद्राकडून ३०० कोटींचा निधी

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top